Site icon Ashlesha's Recipe

“खमंग Kheer Recipe-खीर रेसिपी: दूध, तांदूळ आणि साजूक स्वाद”

Kheer- खीर आपल्या भारतीय आहार संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असलेल्या गोड पदार्थ म्हणजे Kheer- खीर. तसेच Kheer- खीर म्हणजे आपली परंपरा आहे व आपल्या पारंपारिक पदार्थांमध्ये खीरीचा समावेश आहे.प्रामुख्याने Kheer- खीर तांदूळ व दुधापासून तयार केली जाते.

Read More : Veg Biryani

थोडे खिरी विषयी.

खिरीत सगळ्यात महत्त्वाचा घटक पदार्थ असतो तो म्हणजे दूध. दुधाला संस्कृत मध्ये क्षीर म्हटले जाते व क्षीर या नावापासूनच कदाचित Kheer- खीर हे नाव पडले असावे असा आयुर्वेदात उल्लेख केलेला आढळतो. भारतात अगदी इतिहास कालापासून खिरीचा उल्लेख आढळतो परंतु उत्तर भारतातून तिचा प्रसार झालेला आहे असे म्हटले जाते. खीर ही मुख्यतः तांदूळ, दूध, सुकामेवा, केशर, वेलदोडा, मावा अशा पदार्थांपासून स्वादिष्ट व खमंग Kheer- खीर बनवली जाते.छोटे मोठे सणवार व पाहुणचार अशा प्रत्येक वेळेस भारतीय संस्कृतीत खीर आवडीने बनवली जाते. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक प्रांतात Kheer- खीर बनवली जाते व आवडीने खाल्ली जाते.Kheer – खीर प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहे,कदाचित बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असेल, पण विशेषतः सगळीकडे तांदळापासूनच खीर बनवले जाते.त्यात कुठे कच्चा तांदळाची तर कुठे भिजवलेल्या तांदळाचे तर कुठे शिजवलेल्या साध्या भातापासून खीर बनवली जाते. तसे खिरीशी महाराष्ट्राचे अध्यात्मिक व भावनिक नाते आहे. महाराष्ट्रात छोट्या मोठ्या घरगुती समारंभात ते एखाद्या धार्मिक कार्यापर्यंत खिरीला मानाचे स्थान आहे.असे म्हटले जाते की Kheer- खीर ही लक्ष्मी मातेचा आवडता पदार्थ आहे.प्रत्येक पूजेत खिरीचा नैवेद्यमहत्वाचा भाग मानला जातो. कधी Kheer- खीर पुरी, Kheer- खीर पुरणपोळी,असे पदार्थ नेहमीच केले जातात.नवरात्रात तर खास करून वेगवेगळ्या खिरींचा नैवेद्यअगदी भक्तिभावाने देवीला दाखवला जातो.काही ठिकाणी याच तांदळाच्या खिरीला काही ठिकाणी पायास म्हणतात.पायस म्हणजे तांदूळ तुपात परतून दुधात शिजवले जातात.हा पायस देवीच्या नैवेद्यात अगदी आवर्जून ठेवले जाते.गणपती बाप्पाला सुद्धा रोज एक नवीन गोड पदार्थ नैवेद्याला बनवावा लागतो.अशा वेळेस गणपती उत्सवात मोदकांसोबत एक दिवस खिरीचा ठरलेला असतो. तसेच श्रावणातल्या उपवासात महादेवांच्या खास करून प्रदोष या उपवासाला महिला आवर्जून खिरीचा नैवेद्य करतात.तसेच महाविष्णूलासुद्धा खीरप्रिय आहे असे म्हटले जाते.खीर बनवल्यावर त्यात कणभर मीठ अवश्य घालावे असे माझी आई नेहमी म्हणायची. अळणी Kheer- खीर लक्ष्मी मातेला आवडत नाही, आळणी खिरीचा नैवेद्याने लक्ष्मी माता रुसते असे सांगायची. तसेच नैवेद्यासाठी Kheer- खीर बनवताना त्यात वेलदोडा,केशर, सुकामेवा,सारखे सुवासिक व पौष्टीक व मनाला प्रसन्न करणारे पदार्थ टाकुन केलेला नैवेद्य देवाला सुध्दा प्रसन्न करतात. खिरीचा संबंध थेट लक्ष्मी मातेशी लावला जातो.म्हणूनच आई म्हणायची तिन्ही सांजेला खीर कधीही कुणाकडे देऊ नये. तसेच खीर कधीच फेकून देऊ नये. अशी या खिरीचे आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीची जीवाभावाचे नाते आहे.अशा या खिरीचे प्रकार खूप आहेत जसे तांदळाची खीर,गव्हाची खीर,रव्याची खीर, शेवयांची खीर,अळीवाची खीर,उपवासाची खीर,म्हणजे साबुदाण्याची खीर,अळीवाची खीरअशा अनेक प्रकारात आपल्याकडे खीर बनवली जाते. भारताच्या इतिहासात ग्रंथपुराणांमध्ये खिरीचा उल्लेख केलेला आढळतो.अगदी पुराणांमध्ये सुद्धा खिरीचा नैवेद्य किती महत्त्वाचा आहे याचा उल्लेख केलेला आढळतो.महाराष्ट्रात तर प्रत्येक सणवाराला गोड पदार्थ म्हणून Kheer- खीर केली जाते व आवडीने खाल्ली जाते.खिरीत नंतरचा पदार्थ घालतात ते म्हणजे साखर.

Kheer – खीर कुठल्या पदार्थांपासून तयार केली जाते.

खीर बनवण्याचे मुख्यता दोन प्रकार.

प्रकार एक.

साहित्य.

कृती.

प्रकार दोन.

साहित्य.

कृती.

टिप्स.

FAQs.

प्रश्न १ :- खीरी साठी कोणते तांदूळ वापरावे ?

उत्तर :- खिरीसाठी सुवासिक तांदूळ वापरावे. बासमती, इंद्रायणी,चीनोर,आंबेमोहोर यासारखे तांदूळ वापरतात. किंवा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कुठलाही तांदूळ घ्यावा.खिरीसाठी तांदूळ भरपूर स्टार्च असलेला घ्यावा. म्हणजे खीर लवकर घट्ट होते.तांदळात स्टार्च कमी असेल तर खीर खूप उकळू द्यावी लागते.

प्रश्न २ :- खिरीसाठी दूध कसे वापरावे ?

उत्तर :- खिरीसाठी दूध घट्ट असावे व मलईदार असावे.दूध पातळ असेल तर ते थोडे आटवून घ्यावे. म्हणजे पाण्याचा अंश निघून जाईल व खिरीला छान स्वाद येईल. घट्टपणा आणण्यासाठी मिल्क पावडरही वापरू शकतात.

प्रश्न ३ :- खीर करताना त्यात मीठ घालावे का ?

उत्तर :- खिरीत मीठ घालने हे एक धार्मिक भावनांशी जोडलेला संबंध आहे.म्हणून तेआपल्या सोयीनुसार व आवडीनुसार ठरवावे.खानदेशात अळणी खीर खात नाही म्हणून मी कणभर मीठ घालते. खिरीत मीठ घालायचे असल्यास अगदी कणभर मीठघालावे .कणभर म्हणजे बारीक मिठाचे दोन-तीन दाणे घालावे. व ते खीर पूर्ण झाल्यावर व गॅस बंद केल्यावर घालावे,नाही तर दूध फाटू शकते. असे माझी आई म्हणायची पण आपल्याला जर आवडत नसेल तर तुम्ही ते टाळू ही शकतात.

प्रश्न ४ :- खीर कशासोबत खातात ?

उत्तर :- खान्देशात खीर खास करून पुरणपोळी सोबत खाल्ली जाते. साध्या पोळी सोबतही खातात.आपल्या सोयीनुसार आपण खाऊ शकतो स्वीट डिश म्हणूनही खीर खाल्ली जाते.

प्रश्न ५ :- खीर कशी खावी गरम की गार ?

उत्तर :- खीर गरम गरम किंवा फ्रीजमध्ये ठेवून गार करून खाल्ली तरी चालते.कुठल्याही प्रकारे खाऊ शकतात.

प्रश्न ६ :- खीर करताना त्यात मिल्कमेड घालू शकतो का ?

उत्तर :- हो नक्की घालू शकतात मिल्कमेड हे गोड असते म्हणून साखर घालताना गरज असेल तरच साखर घालावी.

Exit mobile version