Site icon Ashlesha's Recipe

“हॉटेल पद्धतीने बनवा साबुदाणा वडा-Sabudana Vada”

Sabudana Vada-साबुदाणा वडा हा उपवासासाठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. Sabudana Vada – साबुदाणा वडा साबूदाणा हिरव्या मिरच्या आले व भाजलेले शेंगदाणे,उकडलेल्या बटाटा,चवीसाठी मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर पासून तयार करून तेलात तळला जातो. आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.

Read More :- Navratri Upavas Padarth

साबुदाणा वड्या विषयी.

आपल्या संस्कृतीत उपवासाला अन्यांना साधारण महत्त्व आहे. व्रत वैकल्य व उपवास हे भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे.आपल्याकडे उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ म्हणजे साबुदाणा,राजगिरा,राजगिऱ्याची लाही, किंवा राजगिऱ्याची पीठ,शिंगाड्याचे पीठ,भगर म्हणजेच वऱ्याचे तांदूळ असे अनेक प्रकार आहेत.पण सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे साबुदाणा किंवा साबुदाण्यापासून बनवलेल्या Sabudana Vada-साबुदाणा वडा हे आहे. Sabudana Vada-साबुदाणा वडा बनवताना मुख्य घटक असतो तो म्हणजे साबुदाणा.साबुदाणा हा स्यागो नावाच्या झाडाच्या चिकापासून बनवला जातो. साबुदाणा म्हणजे पांढऱ्या शुभ रंगाचे खडक दाणे असतात.साबुदाणा हा दोन प्रकारात मिळतो.एक प्रकारचे आपण नेहमी वापरतो तो व दुसरा प्रकार म्हणजे साबुदाण्याचे दाणे अगदी छोट्या आकारात व बारीक असतात. छोट्या आकारातले साबुदाणे लवकर भिजतात.साबुदाणे भिजणे हा त्याच्या दर्जावर अवलंबून असते.उत्तम दर्जाचा साबुदाणा हा लवकर भिजतो व चिकट होत नाही.साबुदाणा महाराष्ट्रात उपासाचे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य घटक आहे.साबुदाण्यात भरपूर स्टार्च असल्यामुळे उपवासात दिवसभर ऊर्जा मिळवण्यासाठी साबुदाण्याचा वापर केला जातो.साबुदाण्यापासून साबुदाणा खिचडी,साबुदाणा खीर, साबुदाणा वडा,बनवला जातो. साबुदाण्याचे काही पदार्थ बनवून वर्षभर साठवले जातात.म्हणजेच साबुदाणा चकल्या, साबुदाण्याचे पापड, तसेच साबुदाण्यावर प्रक्रिया करून एक वेगळ्या प्रकारचा साबुदाणा बनवला जातो त्याला नायलॉन साबुदाणा म्हणतात. नायलॉन साबुदाणा हा प्रक्रिया करून आकाराने थोडा मोठा झालेला असतो. नायलॉन साबुदाणा तळून त्याच्या तिखट, मीठ,शेंगदाणे घालून चटकदार उपासाचा चिवडा केला जातो. महाराष्ट्रात साबुदाण्यापासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा हा आहे.साबुदाणा वडा हा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. Sabudana Vada-साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड च्या यादीत येतो.अनेक शहरांमध्ये साबुदाणा वड्याचे खास अशी हॉटेल्स आहेत जिथे फक्त साबुदाणा वडा बनवला जातो.मुंबईत व अनेक शहरात साबुदाणा वड्याचे सुद्धा स्टॉल ठेले व लागलेले दिसतात. साबुदाणा वडा उपवासातच नाही तर एक नाश्ता म्हणून सुद्धा चहा सोबत चव घेत खाल्ला जातो. साबुदाणा वडा बनवताना चार ते पाच तासासाठी भिजवला जातो. साबुदाणा हा भिजवल्यानंतरच खाण्या योग्य होतो. साबुदाणा हा चार ते पाच तासासाठी भिजवावा साबुदाणा भिजायला किती वेळ लागेल हे त्याच्या दर्जावर अवलंबून असते. छोट्या आकारातील साबुदाणा ही एक तासात भिजतो पण आपल्याकडे सहसामोठया आकाराचा साबूदाणा वापरला जातो. छोट्या आकारातील साबुदाण्याचे पापड बनवले जातात व उपवासात तळून खाल्ले जातात.

साबुदाणा वडा कसा बनवतात.

Sabudana Vada-साबुदाणा वडा बनवताना चार ते पाच तास भिजवलेला साबुदाणा वापरला जातो.भिजवलेल्या साबुदाण्यात उकडलेला बटाटा,भाजलेल्या शेंगदाण्याची पूड घातली जाते.बटाट्यामुळे साबुदाणा वड्याला आकार देणे व तो आकार टिकून राहण्यास मदत होते. शेंगदाण्याची पूड मुळे साबुदाणा वडाला छान कुरकुरीतपणा येतो व तळल्यानंतर रंगही छान येतो. त्यानंतर त्यात चवीसाठी हिरवी मिरची,आले,मीठ,कोथिंबीर व जिरे घातले जाते व मिश्रण तयार केले जाते.या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करूनघ्यावे.एकगोळा हातावर घेऊन घेवुन गोल चपटा आकाराची टिक्की सारख्या आकाराचा वडा बनवला जातो व तेलात तळलाजातो.अशा पद्धतीने साबुदाणा वडा तयार होतो. हा वडा ओल्या नारळाची चटणी किंवा चिंचेच्या चटणी सोबत खाल्ला जातो.

साबुदाणा वडा तयार करताना घ्यायची काळजी 

साहित्य :-

पूर्वतयारी :-

कृती :-

टिप्स :-

दह्यातली ओल्या नारळाची चटणी :-

साहित्य :-

कृती :-

घट्ट दही कसे लावावे 

FAQs 

प्रश्न 1. साबूदाणा वडा तेलातका का विरघळतो ?

उत्तर :- साबूदाणा पुर्ण भिजला नसेल तर साबूदाणा कडक राहतो व बटाटा व शेंगदाणा शेंगदाण्याच्या मिश्रणात मिक्स होत नाही. मिश्रण नीट तयार न झाल्यामुळे साबुदाणा मोकळाच राहतो व तेलात टाकल्यावरवडा विरघळतो.

प्रश्न 2. साबुदाणा वडा तेलकट का होतो ?

उत्तर :- कारण बटाटा जास्त शिजलेला असेल व खूप मिश्रण पातळ असल्यामुळे तेल जास्त शोषून घेते व वडा तेलकट होतो.

प्रश्न 3. वडा वडा तेलकट होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी ?

उत्तर :- वडा तेलकट होऊ नये यासाठी मिश्रण फार पातळ करू नये. बटाटा जास्त शिजवू नये.शेंगदाण्याची पूड जास्त बारीक करू नये.म्हणजे मिश्रण ओलसर होत नाही व वडा तेलकट होत नाही.वडा तळून झाल्यावर लगेचच टिशू पेपरवर टाकावा हा एक पर्याय वापरू शकतो.

Exit mobile version